Friday, March 18, 2011

एकवटुनी सारे बळ ...

एक पाखरू अवघडलेले ,
कळपापासून दुरावलेले ...
शोधत होते सखेसोबती
जरी मिळाले .... तरी न् पटलेले ..
झाले बेभान एका अनामिक क्षणी
विस्कटले पंख जमिनीवरी ....
वाटले .. संपले .. आयुष्य विस्कटले
कधी न् उडणार असे वाटले ...
अचानक असे घड्याळ थांबले
काटे जणू जगण्याला भिडले ....

कुठूनी आला सुखावह वारा
उघडूनी मनातल्या सर्व खिडक्या दारा ...
एकवटुनी सारे बळ मग
उभे राहिले उडवायला ...
झेपावयाला मग फक्त सुर्याचकडे !!!

प्र...साद जोशी.
13.03.2011

0 comments:

Post a Comment